मेधा कुळकर्णी
महिला दिन साजरा करण्यापुरतं महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं म्हणजे महिलांचा शाश्वत विकास नव्हे. त्याऐवजी विधिमंडळात स्त्रियांच्या समस्यांबद्दल सखोल विचारमंथन गरजेचं!
जुन्या काळातले प्रसिद्ध लेखक मामा वरेरकर (लेखनकाळ १९११ ते १९६२) यांच्या साहित्यातल्या स्त्री व्यक्तिरेखा काळाच्या पुढे असत. त्यांची एक नायिका म्हणते, ‘‘बाई स्वत: गुलाम होणार नाही आणि ती दुसऱ्याला गुलाम करणार नाही.’’ हे एक विधान ‘मी आणि माझं’ याच्या पलीकडे जाणारं स्त्रीवादाचं तत्त्वज्ञान सांगतं. जगभर स्त्रीचळवळ लिंग-वर्ण-धर्म-जातविषयक भेद, अत्याचार, हिंसा, शस्त्रास्त्र व्यापार, अणु, युद्ध या साऱ्याबद्दल भूमिका घेताना अन्यायग्रस्तांबरोबर राहण्याची, अन्याय दूर करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना साथ देण्याची भूमिका घेत आली आहे. यातला मैत्रभाव, भगिनीभाव हाच स्त्रिया आणि अवघ्या प्राणीजगताला शाश्वत विकासाकडे नेणारा आहे. हा भाव महाराष्ट्रात कुठे सापडतो का, ते शोधणं गरजेचं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा