२०२४ ची सार्वत्रिक निवडणूक खरोखरच अद्भुत होती. वातावरणात भरून राहिलेली निराशा, हुकूमशाहीची घुसमटून टाकणारी सावली आणि धार्मिक तेढीची मळमळ या क्षणी तरी नाहीशी झाली आहे. आता कदाचित एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकते. ही निवडणूक काही नेहमीसारखी सामान्य निवडणूक नव्हती. राजकीय व्यवस्था कायम राहील का ही शक्यताच धोक्यात आली होती. निवडणुकीच्या निकालांनी पंतप्रधान मोदींच्या वरचष्म्याचा फुगा फोडला आहे. आपले काम, आपली बलाढ्य ताकद, सर्वज्ञता यांचा बोलबाला आणि आपल्या विचारसरणीचा आग्रह या सगळ्यातून त्यांनी ही निवडणूक स्वतःभोवती केंद्रित करत नेली होती. पण आता या क्षणी मोदी हे इतिहास घडवणारे नेते नाहीत की लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल दैवत आहेत, ही भावना नाही. आज, ते इतर इतर सगळ्या राजकारण्यांसारखेच एक राजकारणी आहेत. लोकांनीच त्यांना या पातळीवर नेऊन ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा