थोर समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर हे सुमारे शंभर वर्षांपूर्वी म्हणाले होते, ‘राजकारण हा नैतिकता सांभाळून करावयाचा व्यवसाय निश्चितच नाही. तरीही राजकारणासारख्या बदनाम क्षेत्रातही किमान लाज बाळगावी लागते. किमान सभ्यतेने वागावे लागते. या साऱ्या मर्यादा बिनदिक्कत ओलांडणे शक्य नसते.’ मॅक्स वेबर यांचे शब्द राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी समजून घेतले पाहिजेत. भारतात अलीकडे नैतिकता, चारित्र्य, विकास, कार्यकुशलता, बौद्धिक सामर्थ्य या शब्दांचे अर्थ आणि संदर्भ पार बदलले आहेत. सत्ताधारी राजकीय पक्ष तेवढा विकाससन्मुख, नीतिमान, कार्यकुशल, बुद्धिमान असा समज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नादान राजकारण्यांनी वाचाळपणा आणि लाचारपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असताना आणि लोकशाही व्यवस्थेचे सामर्थ्य असणाऱ्या सर्व यंत्रणा कणाहीन करण्याचे प्रयत्न सुरू असताना सुजाण मतदारांना गाफिल राहून चालत नाही, पण सुजाण आणि सजग मतदारांची संख्या कमी होऊन एकाधिकारशाही मानणाऱ्या अंधश्रद्ध भक्तांची संख्या वाढत चालली आहे का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा