कोरडवाहू शेतीचे प्रश्न सोडवायचे सध्या दोनच मार्ग आहेत असे सुचविले/भासविले जाते. ते म्हणजे एक तर मोठे सिंचन प्रकल्प सुरू करून तिला बागायती बनवा आणि दुसरा म्हणजे पीक बदल करून काही काळ आश्वस्त वातावरण निर्माण करा! खरीप हंगामातील जवळपास ६५ टक्के पारंपरिक/हवामान अनुकूल पिके बदलून सोयाबीन हे एकच पीक घेतले जाते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हे प्रमाण ८० टक्केपर्यंत पोहोचले आहे. मूग, मटकी, हुलगा, खरीप ज्वारी, तूर, उडीद यांच्याखालील सर्व क्षेत्र सोयाबीन या एकाच पिकाने व्यापले आहे. आपल्या देशाची कडधान्ये आयात २०१९ पासून सातत्याने वाढत आहे. २०२३-२४ मध्ये डाळींची आयात दुपटीने वाढली आहे. ब्राझील या एकाच देशातून फक्त उडदाची २० हजार टन आयात झाली आहे. तर मोझांबिक, म्यानमारसारख्या गरीब देशांतूनही आपण डाळी आयात करीत आहोत. मागील वर्षी जवळपास २८ हजार कोटी त्यासाठी खर्चले आहेत. अन्न आणि पोषण सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डाळी पिकविण्यास शेतकरी धजावत नाहीत हेही तितकेच खरे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा