देवानंद भगवान माने
बाबा आमटे गांधीजींविषयी म्हणत, ‘चुका सगळ्यांकडून होतात फक्त लोक त्या कबूल करत नाहीत. या माणसानेही चुका केल्या फरक इतकाच की त्याने त्या जगासमोर कबूल केल्या’ एखाद्या महापुरुषाचे यश हे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे विचार किती लोकांपर्यंत पोहचले आणि काळानुरूप ते किती आत्मसात केले गेले, यावर अवलंबून असते. गांधीजी पहिल्या निकषानुसार जगात पहिल्या क्रमांकाचे मानकरी! पण दुसऱ्या निकषावर काठावर पास. कारण महान व्यक्ती त्यांच्या आयुष्यात जे कार्य करतात हे झाले त्याचे कर्तृत्व आणि मृत्यूनंतर जे कार्य उरते, ती असते अनुयायांची जबाबदारी. महानता नापास होते ती नाकर्त्या अनुयायांमुळेच. कारण सरकारी कचेरीतील भिंती सजवण्यासाठी, स्वच्छतेच्या अभियानासाठी, राजकीय फायद्यासाठी आणि परदेशी पाहुण्यांना भेटवस्तू देण्यासाठी या गोष्टी सोडल्या तर गांधीजी हा विचार नसून फक्त एक व्यक्ती किंवा वस्तू (भेटवस्तू) आहे असेच सगळ्यांना वाटते. ज्या व्यक्तीचे आणि ज्याच्या विचारांचे जगाला आकर्षण आहे, त्याचा आपल्याच काही देशवासीयांना तिटकारा आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या हत्येचे समर्थन करणारे सुद्धा आहेत. आपल्या महान लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा यापेक्षा वेगळा पुरावा कोणता असू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा