ध्यानधारणा म्हटले की डोळ्यांपुढे लहानपणी रामायण, महाभारत मालिकांत पाहिलेले ऋषीमुनी येत. ते साधारणपणे एखाद्या हिमाच्छादित शिखरावर एकांतात बसलेले असत. तेव्हापासून एकांत ही ध्यानाची पूर्वअट आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली गेली होती. अर्थात पडद्यावर दिसतो तो निव्वळ अभिनय असतो, तिथे एकांतात दिसणाऱ्या ऋषींच्या भोवताली चित्रिकरण करणारा अख्खा क्रू असतो, हे हळूहळू कळू लागले. पुढे २०१९मध्ये अशीच एक प्रतिमा स्मृतिपटलावर कोरली गेली. ती होती कशाय वेश धारण करून गुहेत ध्यानधारणा करत बसलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. निवडणुकीची रणधुमाळी शमली होती आणि विरोधकांवर तोफ डागणारे मोदीजी आता केदारनाथच्या गुहेत जय-पराजय, मोह-माया अशा यःकश्चित, मिथ्या भावनांच्या पलीकडे पोहोचले होते. कोणताही देशभक्त, अध्यात्मिक वृत्तीचा भारतीय भारावेल, असेच ते दृश्य होते. त्याआधीच्या पाच वर्षांत भारताने असे भारावलेपण अनेकदा अनुभवले होते. पण यावेळी काहींना प्रश्न पडला…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा