मिहीर करंदीकर, अनिश्री सुरेश
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस, मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि रस्त्यावरची वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी काही धोरणांचा विचार करत आहेत. चारचाकी गाडी विकत घेण्यासाठी पार्किंगचा पुरावा अनिवार्य करायच्या एका प्रस्तावित धोरणावर माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. महाराष्ट्र सरकार पुढच्या शंभर दिवसांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करायचा विचार करत आहे. १९५० च्या दशकात जपानमध्ये अशी काही धोरणे राबवली गेली; तेव्हा रस्त्यावर असलेली खासगी वाहने कमी करण्यात बऱ्यापैकी यश मिळाले होते. परंतु २०२५ च्या भारतामध्ये त्याचा किती उपयोग होईल याबद्दल शंका आहे. हे धोरण वाहन विकत घेण्यावर निर्बंध लावत असून त्याचा वाहतूक कोंडीवर लगेच किती परिणाम होईल ते सांगता येत नाही. त्याचबरोबर अशा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ बरेच आहे. गर्दीच्या जागांमध्ये रस्त्यावरची वाहने कमी करायला या धोरणाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, पार्किंगच्या जागांची बाजारपेठ तयार करण्यात हे धोरण किती यशस्वी होईल त्यावर त्याचा कोंडीवर किती प्रभाव पडेल, हे अनिश्चित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा