‘काँग्रेसमुळे देशाची बदनामी’ झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे वृत्त (लोकसत्ता- ७ फेब्रुवारी) वाचले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला दिलेल्या उत्तरात नेहमीप्रमाणे पंतप्रधानांनी दुबळ्या काँग्रेसला लक्ष्य करत असताना आपल्या भाषणात एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकरांवर कविता प्रसारित करायची होती म्हणून त्यांना आकाशवाणीतून बडतर्फ केले.’ काही वर्षांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही आपल्या एका मुलाखतीत ‘आपण मुंबई आकाशवाणीच्या नोकरीत असताना सावरकरांची कविता सादर केल्यामुळे नोकरीतून बडतर्फ केले,’ असे सांगितले होते. त्याच मुलाखतीचा धागा पकडून माननीय पंतप्रधानांना भाषणाच्या वेळी हा संदर्भ पुरविण्यात आला असावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा