पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात मोटार चालक अल्पवयीन मुलाला जागेवरच पकडणाऱ्या तेथील नागरिकांचे कौतुक करायला हवे. तो मुलगा पळूनच गेला असता, तर परिस्थिती अवघड होण्याची शक्यता होती. ज्या पोर्शे मोटारीतून ताशी सुमारे दीडशे किमी वेगाने जात हा अपघात झाला, त्या मोटारीला परिवहन खात्याचा क्रमांक मिळाला नव्हता. म्हणजे, त्या क्रमांकावरून मोटारचालकापर्यंत तातडीने पोहोचणे अवघडच झाले असते. पावणेदोन कोटी रुपये इतक्या किमान किमतीची ती महागडी मोटारगाडी कुणा धनिकाची असणार, हे उघडच. मात्र ती चालवणारा त्या धनिकाचा मुलगा वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यापूर्वीच मोटार चालवतो, याचे त्या धनिक बापाला अतिरेकी कौतुक असणे शक्य आहे. मूल पहिल्यांदा उभे राहू लागल्यानंतर पालकांना होणाऱ्या आनंदाएवढाच हाही आनंद. पण आपण आपल्या मुलाच्या हाती मोटार देताना त्याच्याकडे परवाना नाही, हे पालकास माहीत असणारच. तरीही ‘त्यात काय? मी आहे ना!’ अशी प्रवृत्ती बळावते, ती पैशाने आपण काहीही मिळवू शकतो, या मनोवृत्तीतून. श्रीमंती ओसंडून वाहू लागली की असे घडते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा