राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्यापासून वाद, आरोप-प्रत्यारोप आणि निषेधाला उधाण आलं आहे. आधी त्यांनी टेक्सासमध्ये म्हटलं की ‘देशात प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो. सध्या भारतात याच मुद्द्यावर संघर्ष सुरू आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा दाखला मिळाला.’ ते असंही म्हणाले की ‘भारतात शिक्षणातून विशिष्ट विचारधारेचा प्रसार केला जात आहे. बहुतेक विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती संघाकडून केली जात आहे.’ वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींशी संवाद साधताना राहुल म्हणाले, ‘शिख व्यक्तीने पगडी परिधान करावी की नाही, कडा घालावा की नाही, गुरुद्वारात जावं की नाही, यावरून भारतात संघर्ष होऊ लागले आहेत. हे केवळ एकाच धर्माच्या बाततीत नाही, सर्वच धर्मांबाबत अशीच स्थिती आहे.’ जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, ‘भारतात समता प्रस्थापित होईल तेव्हा काँग्रेस आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा