दोन वर्षांपूर्वी उत्तर भारतात उष्णतेची लाट आली आणि त्यावर्षीच्या मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली. मागील एका वर्षात तांदळाचे भाव ११.५ % वाढले की लगेच सरकारने तांदळाची निर्यात बंद केली. यावर्षी तांदळाचे उत्पादन १३०८ लाख टन झाले आहे आणि पुरेसा साठाही आहे तरी निर्यात बंदी केली आहे. कारण चालू हंगामात उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला टोमॅटोच्या दराने शंभरी पार केल्यामुळे, सरकार हस्तक्षेप करून ते ग्राहकाला स्वस्तात पुरविण्याच्या प्रयत्नात आहे. सहा महिन्यांपूर्वी कांद्याची स्वस्तात विक्री करावा लागल्यामुळे अनुदान जाहीर केले होते. ते मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. खरीप हंगामाची सुरुवात होत असतानाच बोगस बियाणे आणि खताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधी अपुऱ्या आणि पुढे संततधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. या वर्षी कडधान्याचा पेरा १०-१५ % घटल्यामुळे डाळी २०० पार जातील ही भीती आहेच. खाद्य तेलाच्या आयातीवर खूप खर्च होत आहे म्हणून ईशान्येकडील राज्यात जंगल तोडून पाम लागवड करण्याची घोषणा झालीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याला संधी मिळताच शेती सोडायची आहेच (अगदी ती संधी अग्निवीर बनण्याची का असेना). या सर्व बाबी आपल्या शेती क्षेत्राची प्रकृती किती तोळामासा आहे आणि त्यातील सुधारणासुद्धा (वाढ) तिळा-तांदळाएवढी अल्प असल्यामुळे ती एखाद्या आपत्तीने पुन्हा मूळ पदावर येते हेच दर्शवितात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा