राजस्थानातील कोटा शहरासह देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी आत्महत्येच्या घटना गेल्या काही महिन्यांत नोंदविल्या गेल्या. कोटा शहरात वर्षभरात तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. कोटासह देशभरातील प्रशिक्षण केंद्रांचे नियमन सरकारने करावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांना केली होती. सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी केली आणि पालकांचा दबाव हेच आत्महत्यांमागचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले. मात्र कोटा येथील वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’च्या ‘लोकनीति केंद्रा’तर्फे आक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कोटा येथे शिकणाऱ्या एक हजार विद्यार्थी/ विद्यार्थिनींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष विचारप्रवृत्त करणारे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा