-ॲड. प्रतीक राजुरकर
देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारूण पराभवाला सामोरं जावे लागले. महायुतीत भाजपने आणि मविआत शिवसेनेने सर्वाधिक जागा लढवल्या. त्यांच्या घटक पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान हे सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचेच झाले. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या नादात भाजप आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष कमी जागा लढवूनही त्यांच्या विजयातील जागांचे अंतर केवळ दोन जागांचे आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सर्वाधिक जागा लढवूनही त्यांच्या पक्षाला निम्म्यापेक्षा कमी जागांवरच विजय मिळवता आलेला आहे. मविआत राष्ट्रवादीने १० पैकी सात तर काँग्रेसने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला २१ पैकी ९ जागांवर विजय मिळवता आला. ठाकरेंच्या तुलनेत पवार आणि काँग्रेसला मविआत सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसते. सहानुभूती ठाकरेंची आणि फायदा मात्र काँग्रेस – राष्ट्रवादीचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा