पंतप्रधान गेल्या आठवड्यात – ३१ ऑक्टोबर रोजीच्या जाहीर भाषणात जे काही बोलले त्यातील काही गोष्टी ज्या मला चिंताजनक आणि थोड्या भीतीदायक वाटल्या. पंतप्रधान मोदी हे आपल्या खंडप्राय देशातले वैविध्य वारंवार दुर्लक्षित करतात, ही चिंताजनक बाब त्यांच्या या भाषणातून उघड झाली. एकसमानता हाच पुढे जाण्याचा मार्ग असून जो कोणी ‘एक राष्ट्र- एक नागरी संहिता/ एक रेशन कार्ड/ एक निवडणूक’ या त्यांच्या अजेंड्याला विरोध करील तो भारताच्या एकात्मतेच्या विरोधात आहे, असा या मुद्द्याचा सूर होता. हे भीतीदायकही आहे, कारण ही विधाने वास्तवापासून पार तुटलेली आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा नारा हा खरी धर्मनिरपेक्षता आणि सर्वांचा विश्वास यांवर आधारित कसा होता हेच मोदींनी याही भाषणात सांगितले. पण आता कुणीतरी त्यांना वास्तव सांगायला हवे की, गेल्या दहा वर्षांत बहुतेक मुस्लिम त्यांच्यापासून दुरावले आहेत आणि ‘सबका साथ, सबका विकास, सब का विश्वास’ या घोषणेवर अल्पसंख्याकांचा आता विश्वास उरलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा