शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांसह महाविकास आघाडीची सामाजिक कामगिरी उत्तम आहे म्हणून मतदारांनी तीस जागांवर त्यांना विजयी केले असे विश्लेषण व आकलन करणे म्हणजे महाराष्ट्र न समजणे होय. तसे असते तर मंत्री नारायण राणे, उदयनराजे भोसले आणि श्रीकांत शिंदे हे विजयी झालेच नसते. पण याचा अर्थ मतदारांना महायुती हवी होती असाही नाही. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना आश्वासनांखेरीज काहीच दिले गेले नाही, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी विश्वास जनमानसात निर्माण झाला नाही. बेरोजगारीचे वास्तव भेडसावत असतानाच नशेखोरीने महाराष्ट्र हवालदिल झाला आहे. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर असतानाच सर्व प्रकारच्या गुन्हेगारीने हे राज्य त्रस्त झाले आहे. वर्तमानकाळातील सर्व प्रकारच्या प्रश्नांची मुळे कालच्या काँग्रेसच्या कारकिर्दीतच आहेत असे सांगून वेळ मारून नेण्याची आणि जबाबदारी झटकण्याची विचित्र सवय गेल्या १० वर्षांत सत्ताधारी भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांना जडली आहे. या खोटारडेपणाचा महाराष्ट्राला खरा राग आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा