“रामायणात मंथरेनेच कैकयीच्या मनात सत्तेची अभिलाषा निर्माण केली. विनेश फोगाट माझ्या आयुष्यातली मंथरा आहे. सुरुवातीला हजारो कुस्तीपटू माझ्याविरोधात उभे होते. आज केवळ सहा जण शिल्लक आहेत…” बृजभूषण सिंग यांचं हे वक्तव्य. ते केलं, तेव्हा सिंग सत्ताधारी भाजपचे खासदार होते. देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडू त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत होत्या. पण या बाहुबली म्हणून ओळख असलेल्या खासदाराविरोधात साधा एफआयआर नोंदवण्यासठीही खेळाडूंना झगडावं लागलं. पंतप्रधानांनी आपलं म्हणणं ऐकावं, एवढी साधी अपेक्षा होती या मुलींची. न्यायासाठी त्या जिथे ठाण मांडून बसल्या ते जंतरमंतर मोदींच्या स्वप्नातल्या नव्या संसद भवनापासून अवघ्या काही किलोमीटरवर होतं. या मुली सुमारे चाळीस दिवस तिथेच थंडी-वाऱ्यात बसून होत्या. पण बेटी बचाओची घोषणा देणाऱ्या पंतप्रधानांच्या कानांपर्यंत त्यांचा आक्रोश शेवटपर्यंत पोहोचलाच नाही. जसा मणिपूरमधील महिलांचा पोहोचला नव्हता, तसाच. काल तिच विनेश जगातल्या अत्यंत मानाच्या स्पर्धेत सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर उभी होती आणि तिच्याबरोबर जंतरमंतरवर कित्येक रात्री काढलेली साक्षी मलिक हिंदीत त्या समान्याचं समालोचन करत होती. हा केवळ क्रीडाप्रेमींसाठीच नव्हे, तर मानवाच्या दुर्दम्य ध्येय्यासक्तीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाच्याच स्मृतिपटलावर कायम कोरलेला राहील असा हा क्षण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा