सतीश भा. मराठे
१४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली. इंग्रज आपल्या देशातून निघून गेल्यावर हिंदू आणि मुस्लिम यांना एका देशात नांदणे शक्य नाही, असा मुद्दा लावून धरला गेला. त्यातूनच द्विराष्ट्रवाद या संकल्पनेला खतपाणी घालण्यात आले आणि धर्मावर आधारित या देशाची म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झाली. हिंदूंच्या तथाकथित जाचातून सुटका झाल्यावर हा देश सुखाने नांदण्यास काहीच हरकत नव्हती. पण तसे झाले नाही.
पाकिस्तानचा गेल्या ७६ वर्षांचा इतिहास हा रक्तरंजित घटनांनी भरलेला आहे. यासाठी हिंदू जबाबदार नाहीत हे मान्य करण्याइतका विचारीपणा त्या देशाकडून दाखवल्या गेला नाही. तो देश अस्तित्वात येऊन सहा वर्षे पूर्ण होत नाहीत तोच त्या देशाला गंभीर आणि मूलभूत समस्येने ग्रासले. तिची धग आजही कायम आहे. १९५३ साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अहमदिया मुसलमानांना गैरमुस्लिम घोषित करावे या मागणसाठी तीव्र आंदोलन उभारण्यात आले. या हिंसक आंदोलनात अनेक अहमदियांचा बळी गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा