प्रताप भानु मेहता
‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचा निर्णय वैध ठरवणारा निकाल हा मोदी सरकारसाठी मोठाच कायदेशीर विजय आहे आणि जम्मू-काश्मीरविषयी विद्यमान सरकारच्या भूमिकेलाही त्यामुळे वैधतेचे बळ मिळालेले आहे. याचा अर्थ असा की यापुढे केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर यांच्या परस्परसंबंधांत प्रक्रियात्मक बाबींचा, इतिहासजमा झालेल्या आश्वासनांचा किंवा कायदेशीर किचकटपणाचाही अडसर राहणार नाही. या न्यायालयीन निकालाला लोक कसा प्रतिसाद देतील, हे आपला यापुढला राजकीय इतिहास कोणती वळणे घेतो यावरच अवलंबून राहील. मोदी सरकारचा हा निर्णय जम्मू-काश्मीर अवसानघातच करण्याचा आणखी एक प्रकार असून सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर मान्यतेची मोहोर उमटवली, असे यापुढे म्हणता येईल का? सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे संघराज्य व्यवस्थेसाठी घातक पायंडे पडण्याबाबतच्या, किंवा एकंदर अधिमान्यतेवरल्या विश्वासाला तडे जाण्याबाबतच्या शंका खऱ्या ठरतील, की एका राज्याचे भारताच्या संविधानात्मक व्यवस्थेशी संपूर्ण तादात्म्य साधले जाण्याची अपेक्षा यातून पूर्ण होईल आणि ‘अनुच्छेद ३७०’ लागू असतानाच्या निर्णयांमधला, प्रशासनातला अर्धेमुर्धेपणा आता दूर होईल? खोरे सध्या शांत आहे. अगदी अबोल शांतता आहे तिथे. या चिडिचूप अवस्थेलाच अंतिम विजय समजले जाईल? की, न्या. संजयकिशन कौल यांच्या निकालपत्रातील आगळ्या अपेक्षेनुसार, काश्मीरमध्ये झाले गेले विसरून ‘सत्य आणि सलोखा’ साधण्याच्या संधीची दारे उघडतील?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा