महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा पक्ष आहे की त्या पक्षातील नेते मंडळी आपल्याच पक्षासोबत असावीत असे इथल्या प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाला वाटत असते! आणि बऱ्याचदा तर, ‘आम्ही जिथे जातो तिथे सत्ता असते’ असा दावासुद्धा या पक्षातील नेत्यांकडून केला जात असतो! हाच तो पक्ष, जो वेगवेगळ्या गटांमार्फत राजकारणात निरनिराळ्या पक्षांशी युती आघाडी करून निळा झेंडा हातात घेत आपली राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ असे या पक्षाचे नाव. या पक्षाचे अनेक गट राजकारणात दिसत असतात, त्यापैकी एका मोठ्या गटाकडे तर केंद्रातील मंत्रिपदही आहे. पण सत्तेत याच पक्षाच्या गटाचा सहभाग असला तरी, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणे, अनेक आंदोलने करणे, मोर्चा काढणे हे या पक्षासाठी व नेत्यांसाठी काही नवीन नाही. या पक्षाची आठवण आजच्या महाराष्ट्राला- आजच्या राजकारणाच्या संदर्भात- नव्याने करून देणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा