संघटनात्मक बांधणी, प्रमुख नेत्यांमधील समन्वय या पक्षात प्राण फुंकण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या बाबींकडे लक्ष न देता मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगत वावरणे किती महागात पडू शकते याची जाणीव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना कदाचित आता झाली असेल. नाना तसे वेगवेगळ्या पक्षांत फिरून आलेले. केवळ मोदींशी पंगा घेत खासदारकीचा राजीनामा दिला म्हणून पक्षाने, त्यातही राहुल गांधींनी, त्यांच्यावर कमालीचा विश्वास टाकला. तो सार्थ ठरवण्याऐवजी केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देत राज्यातील राजकारणाची सूत्रे फिरवणाऱ्या नानांनी पक्षाला पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर आणून ठेवले. इतके की २०१४ च्या मोदी लाटेपेक्षासुद्धा पक्षाची कामगिरी या वेळी सुमार ठरली. या वेळी एवढे पानिपत का झाले? त्याला एकटे नाना जबाबदार की पक्षातील दिल्लीतले नेतेही? यावर अपेक्षित मंथन यथावकाश घडून येईल पण नेतृत्व म्हणून नानांचा या अपयशातला वाटा सर्वाधिक हे कुणीही मान्य करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा