साईबाबा प्रकरण सध्या चर्चेत आहे. ‘प्रत्यक्ष जंगलात राहून हातात बंदूक घेत सरकारविरुद्ध लढणारे, जंगलातल्याच गावांमध्ये राहून बंदूकधारी नक्षलींना सोयीसुविधा व मदत पुरवणारे, जंगलापासून दूर शहरात राहून या चळवळीच्या संपर्कात असणारे व त्यांना पाहिजे तशी मदत पुरवणारे, जंगलाबाहेर राहून नक्षलींच्या समर्थक संघटनांमध्ये निशस्त्रपणे सक्रिय भूमिका बजावणारे, या चळवळीशी थेट संबंध नसलेले पण नक्षलींच्या विचारांशी आस्था बाळगणारे, नक्षलींची हिंसा मान्य नाही, पण त्यांचा विचार लक्षात घेण्याजोगा अशी उघड भूमिका घेणारे, जंगलाबाहेर राहून नक्षलींची ‘समर्थक संघटना’ नावाची अधिकृत विंग सांभाळणारे व त्यासाठी त्यांना पाहिजे ती मदत गुप्तपणे पुरवणारे, अशी कृत्ये करताना आपला समाजातील चेहरा समाजसेवकाचा राहील याची काळजी घेणारे, चळवळीशी थेट संबंध नाही. पण स्वत:चा जंगल वा त्यालगतचा व्यवसाय नीट चालावा म्हणून त्यांना नियमित खंडणी देणारे. जंगलातील गावात राहायचे असल्याने नाइलाज म्हणून नक्षलींना मदत करावी लागणारे…’ नक्षली चळवळीचा पट इतक्या साऱ्यांना कवेत घेणारा. यातील कुणाचा संबंध प्रत्यक्ष तर कुणाचा अप्रत्यक्ष. अशावेळी कायदेशीर कारवाई करताना दक्षता घेणे गरजेचे. ती न घेतली तर काय होते, हे साईबाबा प्रकरणाने पोलिसांना दाखवून दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा