‘आजवर कोणत्याही वसाहतवाद्यांनी जेवढं गोव्याचं नुकसान केलं नव्हतं, तेवढं दिल्लीतून आलेले लोक करत आहेत. गोव्याची अवस्था दिल्लीच्या वसाहतीसारखी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आमची शेत, टेकड्या, किनारे, पुळणी सारं काही उद्ध्वस्त केलं जात आहे आणि आता आमची शांतताही हिरावून घेण्यात येऊ लागली आहे. डोप पार्ट्या, ट्रान्स म्युझिक, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांचं सेवन वाढलं आहे. आम्ही सनबर्नला विरोध करत होतो, पण प्रत्यक्षात सध्या रोजच रात्री सनबर्न सुरू आहे…’ या प्रतिक्रिया आहेत अंजुना किनारा परिसरातील रहिवाशांच्या. १५ ऑगस्टपासून तिथे एक वेगळाच ‘मुक्तीसंग्राम’ छेडला गेला आहे. गोवेकरांना मुक्तता हवी आहे ती मध्यरात्री सुरू होणाऱ्या डीजेच्या दणदणाटापासून, डोळ्यांवर आक्रमण करणाऱ्या लेझर शोपासून आणि तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांपासून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा