आरोग्यव्यवस्थेच्या वाढत्या केंद्रीकरणाबाबत ‘आरोग्यव्यवस्थेचे बदलते अर्थकारण रुग्णाला मेटाकुटीला आणणारे’ या लेखात (३ ऑक्टोबर) आपण जाणून घेतले. या प्रश्नाचा आणखी एक पैलू असा की, आरोग्यव्यवस्था किंवा रुग्णालयांना इतका पैसा मिळतो आहे, तर त्याचा लाभ तेथील कर्मचाऱ्यांना होतो आहे का? या व्यवस्थेत कार्यरत असलेले कर्मचारी श्रीमंत होत आहेत का? या दोन्हीचे उत्तर ‘नाही’ असे आहे. भारतीय वैद्यकीय शिक्षण यंत्रणेच्या रचनेतच त्यातील केंद्रीकरणाची काही कारणे लपलेली आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च हे बाजारीकरणाचे मोठे कारण आहे. देशात आज अवघी १०८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात १,०८,८४८ पदवीधर आणि ६८,००० पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा आहेत, तर बाकी ५९८ खासगी महाविद्यालये आहेत. प्रत्येक शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर शासन शुल्क सवलतीच्या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करते. परंतु खासगी वैद्यकीय पदवीधर शिक्षण घ्यायचे असल्यास आज एका विद्यार्थ्याला १.५ ते २ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत हा आकडा आणखी वाढतो. शिक्षणानंतर रुग्णालय सुरू करायचे असल्यास खर्च काही कोटी रुपयांच्या घरात जातो. परिणामत: अनेक विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन नोकरी करणे पसंत करतात. इतके कर्ज डोक्यावर असताना आणि लठ्ठ पगाराची नोकरी खुणावत असताना कुठलाही विद्यार्थी ग्रामीण भागातील सेवांकडे कसे वळणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा