नागेश चौधरी
नवरात्रात होणाऱ्या ‘रामलीला’ कार्यक्रमाचे समापन दसऱ्याच्या दिवशी रावण-दहनाने करण्याची प्रथा उत्तर भारतात दिसून येते. तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस’च्या आधाराने सादर होणारे नाट्यमय प्रसंग असे ‘रामलीला’ उपक्रमाचे स्वरूप असते आणि रावणाच्या वधाने हे आख्यान संपते म्हणून फटाक्यांनी भरलेल्या रावणाचे दहन हा त्या नाट्यीकरणाचा भाग. अर्थात गेल्या काही दशकांत सर्वच सणांचे आणि प्रथांचे उत्सवीकरण होऊ लागल्यामुळे रामलीला कार्यक्रमाशी रावण-दहनाचा संबंध अनेक ठिकाणी उरलेला दिसत नाही. रामचरितमानस, तुलसीदास, रामलीलेतला अखेरचा प्रसंग या कशाचाही विचार न करता एक इव्हेन्ट म्हणून रावण-दहन केले जाते आणि त्याला भाबडे जनसामान्य धर्माशी संबंधित असलेला सोहळा मानतात. पण दक्षिणेतील राज्यांत- विशेषत: तमिळनाडूत- रावण-दहनासारखी प्रथा मान्य होणारी नाही. महाराष्ट्रातही रावणाबद्दल उत्तर भारतीय परंपरांपेक्षा निराळे चिंतन, निराळा विचार झालेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा