चंडीगड नगरपालिकेतील जनादेश बदलणे आणि आयकर विभागाने काँग्रेसचा निधी गोठवणे अशा तुलनेत क्षुल्लक कृत्यांमुळे मोदींनी मिळवलेले सर्व फायदे निष्प्रभ झाले आहेत. नरेंद्र मोदी आणखी पाच वर्षांसाठी पंतप्रधानपदी विराजमान होतील याबाबत मला कोणतीही शंका नाही. पण भाजप लोकसभेत ३७० जागा जिंकेल आणि एनडीएमधील त्यांचे सहकारी पक्ष ३० जागा जिंकतील, या त्यांच्या भाकिताबाबत मात्र माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. इथे काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे तिघेही आपापल्या प्रभावक्षेत्रात काही जागा जिंकतील. भाजपने ग्रामीण भागातील मतदारसंघात आपली जागा निर्माण केली आहे. शिवसेनेतील शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हे भाजपचे नवे मित्र विरोधकांपेक्षा काही अधिक जागा जिंकतील, पण मोदी सांगत आहेत, तेवढ्या जागा त्यांना नक्कीच मिळणार नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा