महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दलची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही लष्करी मोहिमा सुरू होत्या. त्यात काही केल्या यश येत नव्हते. या मोहिमांदरम्यान फिरत असताना एका वृद्ध स्त्रीच्या घरी जेवणासाठी महाराज थांबले होते. आपल्याकडे जेवायला थांबलेल्या माणसांमध्ये शिवाजी महाराज आहेत हे त्या वृद्धेला काही ठाऊक नव्हते. तिने महाराजांना एका ताटात गरम गरम खिचडी घालून दिली. ताटात मध्यभागी असलेल्या खिचडीपासून त्यांनी खायला सुरूवात केली. मध्यभागी गरम असलेल्या खिचडीमुळे त्यांची बोटे भाजत होती. ते बघून ती वृद्धा म्हणाली, “अरे बाबा, तू तुझ्या राजासारख का करतो आहेस? तो बघ, शत्रूच्या प्रदेशाच्या मध्यभागी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळी अपयशी ठरतो. खिचडी आधी बाजूबाजूने खायला सुरुवात कर आणि मग मध्यभागी जा. तुझ्या राजाला पण सांग’ ते ऐकून शिवाजी महाराजांनी खिचडी बाजूबाजूने खायला सुरूवात केली आणि भविष्यातील सर्व लष्करी मोहिमांबाबतही तेच केले. बाकी इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा