अखेर बेरोजगारी हा राजकीय चर्चेचा मुद्दा झाला आहे, ही एक चांगली गोष्ट झाली आहे. याचा अर्थ आता राजकीय चर्चांचा रोख आता रस्त्यावरच्या निदर्शनांकडून राज्याच्या धोरणांकडे जाऊ शकतो. बेरोजगारीच्या आक्रोशाकडून रोजगार निर्मितीच्या रूपरेषेकडे वाटचाल होऊ शकते. लोकांची वाटचाल आता पूर्ण हताशतेकडून आशेच्या अंधुक किरणांकडे होण्याचे संकेत आहेत. आपण सत्तेवर आलो तर ही पाच धोरणे राबवू असे म्हणत काँग्रेसने ‘युवा न्याय हमी’ची घोषणा दिली आणि त्यामुळे हे घडले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या मार्गावर राजस्थानमधील बांसवाडा येथील मेळाव्यात दिलेले राेजगाराचे आश्वासने, सत्ताधारी भाजपवर कुरघोडी करणारे ठरले आहे. त्यावर मात करण्यासाठी आता भाजपलाही असेच काहीतरी आश्वासन द्यावे लागेल. या स्पर्धेत या दोघांपैकी कोणीही जिंको, हे खरे आणि चांगले राजकारण आहे, असे म्हणता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा