बिहारमधील धमारा घाट रेल्वे स्थानकात लोहमार्गावर उभे असलेले प्रवासी वेगाने येणाऱ्या ‘राज्यराणी एक्स्प्रेस’खाली सापडून ३७ जण ठार तर २५ जखमी झाले. यानंतर संतप्त जमावाने इंजिनचालकाला बेदम मारहाण करून दोन गाडय़ांच्या काही डब्यांना आग लावली. परंतु लोहमार्ग ओलांडणे किंवा त्यावरून चालणे हा रेल्वेच्या नियमांनुसार दंडनीय अपराध आहे. असे असताना इतक्या मोठय़ा संख्येने लोक (कांवडिया व अन्य रहिवासी) लोहमार्गावर आलेच कसे? वेगाने येणारी ‘राज्यराणी’ धमारा स्थानकावर थांबणार नसल्याने स्थानकावरील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या लोकांना रुळांवरून दूर का नाही केले? गाडी स्थानकाजवळ आली तरी लोक रुळांवरून दूर होत नाहीत हे पाहून इंजिनचालकाने ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला असणार; पण जागच्याजागी थांबायला ते काही रस्त्यावरील वाहन नाही. शेवटी व्हायचे तेच झाले.
लोहमार्गावर आले हा लोकांचा गुन्हा, तर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पूल नाहीत ही रेल्वेची बेपर्वाई. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात नव्या गाडय़ांची भर पडत असते पण प्रवाशांच्या सोयींचे काय?
-अनिल रा. तोरणे ,तळेगाव दाभाडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा