‘जमाखर्च राजकारणाचा’ या सुहास पळशीकर यांच्या सदरातील ताजा (३० जाने.) लेख वाचला. पळशीकर यांनी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील संबंधांचे अचूक विश्लेषण केले आहे. समाजातील एकंदर परिस्थितीचे प्रतििबब राजकारणात पडलेले दिसते. समाजातील मोठय़ा संख्येने लोकांचे जर कोणत्याही मार्गाने जास्तीतजास्त पसा मिळवून लवकरात लवकर श्रीमंत होणे हे एकमेव उद्दिष्ट असते तेव्हा अशा श्रीमंत व्यक्तींना समाजात, त्यांनी संपत्ती मिळवताना केलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करून प्रतिष्ठा आणि संरक्षण मिळते.
सुदैवाने सध्या प्रसारमाध्यमे, सामजिक संस्था, माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकत्रे आणि न्यायसंस्था यांच्या जागरूकतेमुळे अशा प्रकारच्या प्रतिष्ठितांना काही प्रमाणात त्यांच्या गुन्ह्य़ांबद्दल शिक्षा होताना दिसते. भ्रष्टाचार, दहशत, खून, बलात्कार यांसारखे आरोप असलेल्या व्यक्तींना यापुढील सार्वजनिक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून तिकीट मिळू नये याकरिता जनमताचा प्रचंड दबाव निर्माण करणे, त्याचबरोबर ज्यांनी अशी कृत्ये केली असून जे आजही समाजात उजळ माथ्याने वावरताहेत त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, त्यांची संपत्ती जप्त व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न करणे, अशा मार्गानी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील साखळी तुटू शकेल.
– डॉ. मंगेश सावंत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा