तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सुटका केली. या निकालाच्या आधी खालच्या न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात तामिळनाडूत उमटलेल्या प्रतिक्रिया मानवी मनाची अतक्र्यता दर्शवितात.
तामिळनाडूत १९२० च्या दशकात ‘द्रविड कळघम्’ नावाने वंचित वर्गाच्या उत्थानासाठी सामाजिक आंदोलन उभारणारे ई. व्ही. रामस्वामी (नायकर) पेरियार यांनी काही टोकाच्या भूमिका घेतल्या, तसेच पुढे त्यांच्या संघटनेने हिंदू, हिंदी व उच्चवर्णीय या तिघांच्याही विरोधात अनेक वर्षे कार्य केले. याच द्रविड कळघममधून ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (द्रमुक) हा राजकीय पक्ष सुरू झाला व त्यातून फुटून अण्णाद्रमुकची स्थापना झाली. द्रविडियन राजकीय पक्षांचा मूर्तिपूजा व कर्मकांडाला विरोध होता. आज मात्र नेमके त्याच्याविरुद्ध होताना दिसत आहे. जयललितांची सुटका व्हावी म्हणून तामिळनाडूतील ४० हजार मंदिरांमध्ये पूजा व होमहवन इ. कर्मकांड करण्यात आले. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतरचा उन्मादही अनाकलनीयच म्हणावा लागेल.
ताíकक व बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी असलेल्यांकडे या विरोधाभासावर आज तरी उत्तर आहे असे वाटत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा