‘‘तीन वर्षांपासून घरीच गेलो नाही,’’ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव एकदा वैतागून सांगत होते. मूळचे राजस्थानमधील अजमेरचे असलेले यादव हे भाजपच्या मागील तीनही अध्यक्षांचे अगदी जवळचे. त्यांच्याकडे बिहारबरोबर निवडणूक व्यवस्थापन विभागाचे प्रभारीपद आहे. २०१४ मध्ये लोकसभा झाली, की त्यांच्याकडे लगेचच महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविली गेली. त्यातून मोकळा श्वास घेण्याअगोदरपासूनच बिहारची तयारी सुरू झाली होती. मग आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि त्यानंतर उत्तर प्रदेशसह पाच राज्ये. आता गुजरातची सगळी सूत्रे. पण यादव फक्त निवडणूक विभागाचे प्रभारी नाहीत. त्यांच्यावर संसदीय कामाच्याही तेवढय़ाच जबाबदाऱ्या होत्या आणि आहेत. गुजरात संपल्यावर मग हिमाचल, कर्नाटक, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड.. आणि नंतर २०१९ ला लोकसभा आणि तिच्याबरोबर आंध्र, तेलंगण, ओडिशा, सिक्कीमची निवडणूक. इतका भरगच्च निवडणूक कार्यक्रम. ‘‘सततच्या निवडणुकांचे हे चक्र थांबायला हवे, असे मनापासून वाटतंय,’’ असे यादव सांगत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा