वाजपेयी सरकारमध्ये काय थाट असायचा त्यांचा. दस्तुरखुद्द पंतप्रधान त्यांना नियमितपणे गोंजारायचे. त्यांच्याशी समन्वयासाठी एक तगडा निमंत्रक असायचा आणि तो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शक्तिशाली सुरक्षा समितीमध्येही असायचा. एवढे असूनही ‘ती’ मंडळी वाजपेयी सरकारला आपल्या तालावर नाचवायची. ममता-जयललिता-समता हे तिघे त्यांचे म्होरके. करणार काय? वाजपेयींचे सरकार त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांचे ‘हितसंबंध’ सांभाळण्यात पंतप्रधानांचा बहुतांश वेळ जायचा. त्यात वाजपेयी स्वत: सर्वाना बरोबर घेऊन जाणारे सभ्य गृहस्थ. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) पंचवीस-तीस पक्षांची भेळ जमून जायची. पहिल्या दोन वेळेला (१९९६ व ९८) वाजपेयींना नीट सांभाळता आले नव्हते. पण तिसऱ्या वेळेला (१९९९) त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली. इतक्या घटक पक्षांचे कडबोळे वाजपेयी इतक्या शालीनतेने सांभाळायचे, की आघाडी सरकारांच्या संस्कृतीची पायाभरणी त्यांनी केल्याचे म्हणता येईल. पुढे वाजपेयींची जागा सोनिया गांधींनी घेत त्यांनी ‘एनडीए’सारखाच संयुक्त लोकशाही आघाडीचा (यूपीए) प्रयोग यशस्वी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा