अहमद पटेल यांना आता सारे जग ‘ओळखायला’ लागले असेल. तीनदा लोकसभेत, चारदा राज्यसभा इतका प्रदीर्घ काळ संसदेत वावरणाऱ्या आणि सोनिया गांधींचा १५ वर्षांहून अधिक काळ शक्तिशाली राजकीय सल्लागार असणाऱ्या या नेत्याची प्रकाशाशी कदाचित दुश्मनी असावी. पडद्यावर तर सोडाच; पण अहमदभाई ऊर्फ ‘एपी’ साधे कधी उजेडातही येत नाहीत. काँग्रेसजन त्यांना गमतीने ‘रात का राजा’ म्हणतात. त्यांचा ‘खरा दिवस’ चालू होतो रात्री दहानंतर. मोदी-शहांच्या उदयानंतर तीन वर्षांपासून गुजरात दिल्लीला चालवत असल्याची प्रतिमा आहे; पण खरे तर गेल्या १३ वर्षांपासून गुजरातच दिल्लीला चालवतेय. मोदी-शहांच्या अगोदर दहा वर्षे दिल्ली अहमदभाईंच्या इशाऱ्याने चालायची. ‘‘बघते, असे मॅडम म्हणाल्या की समजून घ्यायचे, आता अहमदभाईंच्या दरबारात जावे लागणार,’’ असा एक काँग्रेस नेता सांगत होता. दरबार तर कसला? काँग्रेस मुख्यालयातील एखादी खोली किंवा एखादा क्लब आणि मध्यरात्रीनंतर त्याला राजकीय ‘बहर’ यायचा. सध्या भाजपमध्ये खासदार असलेला पूर्वाश्रमीचा काँग्रेसी नेता स्वअनुभव सांगत होता, तत्कालीन दोन केंद्रीय मंत्र्यांच्या ‘विनवणी’नंतर त्याला अहमदभाईंनी भेटीची वेळ दिली होती, तीही पहाटे पावणेतीन वाजता! त्या बोचणाऱ्या भयाण अंधाऱ्या रात्री अहमदभाईंच्या दरबारात भेटीसाठी रांगेत असलेले राजकीय व कॉर्पोरेट वर्तुळातील चमचमते हिरे पाहून कुणीही दिङ्मूढ झाले असते. सारे जग गाढ झोपलेले असताना ‘एपी’ गूढपणे दिल्ली ‘ऑपरेट’ करायचे. बहुधा दर वेळी काम फत्तेच व्हायचे. मग मनमोहन सिंग सरकारवरचा अविश्वास ठराव असो वा कोणत्याही राज्यामध्ये कोणालाही शिलेदार नेमायचे असो किंवा एखादे ‘बिग डील’ असो.. एपी वॉज लास्ट वर्ड!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा