उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला गेलेला गोरखपूर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भुईसपाट केला. समाजवादी पक्षाशी असलेले शत्रुत्व विसरून बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे भाजप चारी मुंडय़ा चीत झाला. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या भाजपला पोटनिवडणुकीत हार खावी लागणे हा लोकशाही प्रक्रियेचा विजय म्हणायला हवा. संसदेच्या बाहेर लोकशाहीवर असे शिक्कामोर्तब होत असताना, त्याच दिवशी म्हणजे पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी (१४ मार्च) लोकसभेत सत्ताधारी भाजप सरकारने मात्र लोकशाहीचा ‘पातेघात’ केला. विरोधक गोंधळ घालतात ही सबब दाखवून अत्यंत महत्त्वाच्या वित्त विधेयकावर कोणतीही चर्चा न घडवता ‘गिलोटिन’चा- म्हणजेच पातेघाताचा- वापर करून ते केवळ अध्र्या तासात मंजूर करून घेण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा