आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दररोज सकाळी नऊ ते साडे नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा वृत्तान्त ऐकविला जातो. त्याचे शीर्षक गीत ‘वारी चालली चालली, पंढरपुरा..’ असे आहे. पंढरपूरला वारकऱ्यांची दिंडी जाते. वारकरी वारीला जात असतात. दिंडीतून किंवा एकेकटे. विशिष्ट दिवशी वारंवार एखाद्या ठिकाणी नियमितपणे जाण्याला ‘वारी’ला जाणे म्हणतात. ‘वारी’ यातला विशिष्ट दिवस कालौघात गळून गेला असेल आणि अमुक वारीच्या ऐवजी फक्त वारी हा शब्द उरला असावा. वृत्तपत्रांनी, विविध वाहिन्यांनी मराठीचे धिंडवडे काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. त्या दिंडीत सामील न होता ‘आकाशवाणी’ने तरी सर्वसामान्य श्रोत्यांची मराठी आहे तशीच राहू द्यावी ही अपेक्षा!
-शाहू पाटोळे, औरंगाबाद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा