आर्थिक मंदीत आर्थिक विकास दर गाठता नाकी नऊ येत आहे. तसेच प्रचंड प्रमाणावर वाढलेली महागाई लक्षात घेता घरगुती गॅसवरील सबसिडी रद्द केली. आता आगामी निवडणुका डोळ्यांसमोर व सामान्य जनतेला खूष करण्यासाठी सरकारी कल्याणकारी योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे थेट रोख रक्कम खात्यात जमा होण्याची योजना आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून कशासाठी? खतांसाठी अनुदान योग्य आहे, पण सरसकट सर्व आधार कार्डधारकांना दिल्याने याचा आर्थिक बोजा देशाला परवडणारा आहे काय?
एक तर आधार कार्ड योजनासुद्धा अजूनपर्यंत पूर्ण कार्यान्वित नाही. त्यातसुद्धा प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा आहे. तर दुसरे म्हणजे दारिद्रय़रेषेखाली बहुतांशी विभागांत लोकांची बँक खाती नाहीत. आज सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार, घोटाळे याची लागण झालेली असताना या योजनेतसुद्धा भ्रष्टाचार होणार नाही कशावरून? हे सरकार सर्व स्तरांवर पूर्णपणे अपयशी असल्याने केवळ सामान्य जनतेला खूष करण्यासाठी ही योजना युद्धपातळीवर अमलात आणणे म्हणजे सत्तेवर डोळा, असेच म्हणावयाचे नाही का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा