‘डॉ. आंबेडकर आणि संघ परिवार’ हा मधु कांबळे यांचा लेख (२६ एप्रिल) वाचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संघाला वाटणारा आदरभाव हा काही संघात नव्याने झालेला बदल नाही. संघ स्वयंसेवकांसाठी डॉ. आंबेडकर ‘प्रात:स्मरणीय’ आहेत. मुळात डॉ. आंबेडकरांचे विचार व संघ विचार यांत द्वैत नाहीच आहे. दोन्ही विचारांच्या मुळाशी एकजिनसी निकोप समाज व त्या आधारे सशक्त राष्ट्रनिर्मितीची तळमळच आहे. पू. डॉ. हेडगेवारांनी सर्व भेदांना सामावून घेऊन केवळ एकजीव समरस िहदुत्व-विचाराच्या आधारावर समाज संघटन करण्यासाठी संघाची स्थापना केली. ‘न िहदू पतितो भवेत, िहदव: सहोदरा: सर्वे’ ही घोषणा पूजनीय गोळवलकर गुरुजींनी सर्व िहदू धर्माचार्याच्या मुखातून वदवून घेतली. ‘जर अस्पृश्यता अयोग्य नसेल तर जगात काहीच अयोग्य नाही’ अशा नि:संदिग्ध शब्दांत पू. बाळासाहेब देवरसांनी संघाची जातिभेदविषयक भूमिका स्पष्ट केली. अस्पृश्यताविरोधी अनेक कायदे करून अस्पृश्यता नष्ट करता येणार नाही. कायदे करून समाजाची मानसिकता बदलता येणार नाही, तर एकत्वाची भावना व समरसतेचा संस्कार जोपासूनच हे समाजपरिवर्तन शक्य होईल. हे काम दीर्घ पल्ल्याचे आहे. संघ गेली ९० वष्रे हे काम आपल्या पद्धतीने करत आहे. त्यास हातभार लावण्याऐवजी बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मिनिझम इ. कपोलकल्पित संघर्ष उभे केल्याने मात्र समाजाचा बुद्धिभेद होत राहील.
-विनय सोमण, अंधेरी (पू)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा