दिवंगत प्राध्यापक व लेखक राजशेखर भूसनूरमठ यांचा परिचय करून देणारा व्यक्तिवेध (१४ एप्रिल) त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला चटका लावून गेला. मुळात भारतीय समाजमानसात विज्ञानवादाचा प्रचंड अभाव असताना सोप्या भाषेत सर्वसामान्यांची नाळ विज्ञानाशी जोडण्याचे महत्त्वाचे काम विज्ञानसाहित्यामुळे शक्य होते. अत्यंत कमी संख्येने असणाऱ्या भारतीय विज्ञानकथालेखकांपकी ज्येष्ठ भूसनूरमठ यांच्या जाण्याने या क्षेत्राची खरोखरच हानी झाली. कन्नडमधील विज्ञानसाहित्याचे जनक हे त्यांचे सार्थ बिरूद होते.
आपल्याकडील विज्ञानवादाच्या अभावामुळे साहजिकच विज्ञानसाहित्यही खूप कमी आहे. त्यातल्या त्यात मराठी आणि बंगाली भाषांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात साहित्यात विज्ञानाचा प्रभाव आणि प्रसार जाणवतो. विज्ञानाच्या आणि विज्ञानवादाच्या प्रसारासाठी म्हणूनच आपल्याकडे मूळ कृती कमी तयार होत असतील तर मोठय़ा प्रमाणावर अभारतीय भाषांमधील विज्ञानसाहित्याचे अनुवाद प्रसिद्ध झाले पाहिजेत. आपल्या भावी ‘महासत्ता’पदासाठी आपल्याला ते उपयोगी पडेल. भूसनूरमठ यांच्या जाण्याने ही जाणीव असणाऱ्या माणसांची संख्या एकाने कमी झाली.
मनीषा जोशी, कल्याण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा