‘कसेल त्याची जमीन’ या शीर्षकाखालील लेखात केजरीवाल व मोदी यांची केलेली तुलना अप्रस्तुत असून तर्कविसंगत आहे असे वाटते. वाराणसीच्या निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी स्वत:ला मोदींच्या पातळीवर आणण्याची धडपड केली. लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनी खरे म्हणजे सांसदीय राजकारणातून वेगळे होणे आवश्यक होते. अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे त्यांना खडय़ासारखे बाजूला केले गेले असल्यास यासाठी सर्वार्थाने तेच जबाबदार आहेत. या दोन्ही वयोवृद्ध नेत्यांनी वास्तविक मार्गदर्शकाच्या भूमिकेत स्वत:ला ठेवून स्वत:चा मान राखणे आवश्यक होते.
प्रशांत भूषण यांनी गेल्या वर्षी काश्मीरबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. त्याच वेळी त्यांना पक्षातून बाहेर काढणे आवश्यक होते. मोदींनी मात्र अकार्यक्षम सदानंद गौडांकडून रेल्वे खाते काढून आपली प्रशासकीय तत्परता दाखवून दिली. ‘आप’ने मात्र तसे न केल्याने ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. केजरीवाल अजूनही चळवळीच्या मानसिकतेत असून प्रशासकीय व राजनतिक दिशा व नपुण्याची झलक अजून त्यांनी दाखविली नाही. मोदी यांच्याबाबत मात्र असे नक्कीच म्हणता येणार नाही.
सतीश भा. मराठे, नागपूर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा