‘लोकसत्ता’चे (१९ डिसें.) ‘संसदही सुन्न झाली’ हे शीर्षक वाचून तळपायाची आग मस्तकात गेली. कारण समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे हे या सदस्यांचे ‘प्रथम घटनात्मक कर्तव्य’ आहे. पण पक्षीय स्वार्थापोटी राजकारणाच्या चिखलात आकंठ बुडालेल्या या सन्माननीय सदस्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवणही राहिलेली नाही. ‘संसदही’ या शब्दातील ‘ही’चा अर्थ काय? हे सदस्य म्हणजे ओंडके राजे आहेत काय? ज्यांनी आपले कर्तव्य नीट बजावले नाही म्हणून ही वेळ आली. ते सुन्न झाले तर त्यांत नवल काय?
बलात्कारासाठी फाशीची मागणी करणारे सदस्य तसा ठराव मांडून तो मंजूर का करीत नाहीत? याचा अर्थ ही मागणी केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आहे काय?
-प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा