‘शनी मंदिरात प्रवेशबंदी हा अपमान कसा?’ या विधानामुळे पंकजा मुंडे यांची स्थानिक लोकांची दोन-चार मते वाढतील. फक्त त्यासाठीच त्या असे बोलल्या असतील तर ठीक आहे. आज त्यांच्याकडे पुरोगामी महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व व आज विधानसभेत महिलांचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते. मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असेल तर विविध देवांचा भरणा घरातही भरपूर असतो म्हणून महिलांना घरातूनच बाहेर काढल्याचे उदाहरण ऐकिवात नाही. (जरी घर ही खासगी बाब असली तरी.) केस मोकळे ठेवले वा पुढे घेतल्याने किंवा पँट-टी शर्ट घातल्याने तुमचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान होतो, असे विधान केले तर त्यांना तरी आवडेल का? ( पंकजा मुंडे या केवळ महिला नव्हे तर राज्याच्या मंत्री आहेत.) महाराष्ट्रातील समाजधुरिणांची नावे फक्त मते मिळविण्यासाठीच की सोयीस्कर वेळी टाळ्या मिळविण्यासाठी घ्यायची? सावित्रीबाई-जोतिबा, शाहू महाराज, शिवाजी-बाबासाहेब (पुरंदरे नव्हे).. यांच्या विचारांना तिलांजली द्यायची असेल तर त्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी घ्यायचा तुम्हाला काही एक नतिक अधिकार नाही.
– रविकिरण र. शेरेकर, महाड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा