देशात सहकार व शिक्षणमहर्षी खूप आहेत व पुढेही होतील, पण शरद जोशी यांच्यासारखा कृषिमहर्षी होणे अशक्य वाटते. शेतकऱ्यांचा प्रश्न, धोक्यात आलेला शेती व्यवसाय व एकंदरीतच ७०% देश म्हणजेच ग्रामीण भारताचे अडचणीत आलेले अर्थकारण या पाश्र्वभूमीवर एका अर्थतज्ज्ञाने शेतकऱ्यांचे नेतृत्व करणे हे २५-३० वर्षांपूर्वी काळाच्या पुढचे होते. डंकेल, गॅट प्रस्तावांसह जागतिकीकरणाने बदलवून टाकलेली अर्थव्यवस्था शरद जोशींनी काळापूर्वीच ओळखली. या नव्या लढाईसाठी शेतकऱ्यांना तयार केले. गावागावांतील माता-भगिनींमध्ये आत्मविश्वास पेरला. उत्पादन खर्चावर आधारित मूल्यव्यवस्था हे आमच्यावर उपकार नव्हेत, तर आमचा अधिकार आहे असा उद्घोष तमाम शेतकरी जनतेने केला. शेतकऱ्यांचे राजकारणविरहित एकमेव संघटन असा शेतकरी संघटनेचा नावलौकिक महाराष्ट्रभर पसरला. ‘युनो’मधील सुरक्षित आयुष्य सोडून राज्यातील नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांचे संघटन करणे, त्यांना लढायला शिकवणे, ही फार मोठी मिळकत शरद जोशींनी कमावली होती.
– डॉ. अमोल अशोक देवळेकर, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा