पेशव्यांची चर्चा एक तर बाजीराव-मस्तानी, पानिपतच्या युद्धातील पराजय किंवा पेशवाईच्या अखेरच्या कालखंडातील चालीरीती व सामाजिक परिस्थिती याच अनुषंगाने केली जाते किंवा जाणीवपूर्वक घडवून आणली जाते. पेशव्यांनी लढलेल्या लढाया, त्यांनी छत्रपतींच्या राज्याखाली आणलेला नवीन प्रदेश आणि त्यांचे प्रशासन याबद्दल किती जण जाणतात माहीत नाही. आजच्या महाराष्ट्राला पेशव्यांबद्दल असलेली माहिती ही एक तर कुणाच्या तरी कल्पनेवर किंवा पूर्वग्रहावर निर्माण झालेल्या साहित्यावरच आधारित आहे. त्यामुळे त्याच वातावरणात एखादा चित्रपट प्रदíशत होत असेल, तर आगपाखड करण्याची गरज नाही. त्याऐवजी आंदोलनकर्त्यांना खरेच एवढी काळजी असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. इतिहासातील तथ्ये समजल्यावर कलाकृतींकडे समाज एक साहित्यिक कल्पना म्हणूनच पाहू लागतो. प्रत्येकाला इतिहासाकडे पाहण्यासाठी ऐतिहासिक आणि कलाकृतींकडे बघण्यासाठी कलात्मक दृष्टिकोन प्राप्त होतो. एकदा समाजाला योग्य-अयोग्य काय याची जाणीव झाली म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या अभिव्यक्तीवर बंदीची मागणी करण्याची आवश्यकता नाही.
– हृषीकेश संजय कुलकर्णी, राहुरी (अहमदनगर)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा