‘लोकसत्ता’च्या १५ नोव्हेंबरच्या अंकातील काही वृत्ते उद्धृत केली आहेत. असे कोण म्हणाले? याला महत्त्व नाही. असे विचार मांडले जातात हे नमूद व्हावे..
‘काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, दहशतवादाने स्वातंत्र्य व उदारतेचा पराभव करता येणार नाही’, ‘हा हल्ला म्हणजे निरपराध लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना पकडून शिक्षा करू, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले’, ‘हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे.’ तसेच ‘दहशतवादाला खतपाणी घालण्याचे फ्रान्सचे धोरणही कारणीभूत आहे, असे प्रतिपादन सीरियाचे अध्यक्ष बशर अल्-असाद यांनी शनिवारी केले.’
‘शिक्षा करणे’ आणि ‘चोख प्रत्युत्तर देणे’ आवश्यक असले तरी तेवढेच होणे मुळीच पुरेसे नसते. ‘फ्रान्सचे धोरणही कारणीभूत आहे’ असे उदात्तीकरण करणे सुरू झालेच आहे. इराक युद्धात प्रामुख्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ज्या घोडचुका केल्या त्याची कबुली टोनी ब्लेअर यांनी इतक्या वर्षांनी दिली आहे. जनमानसाची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करणे याच्या जोडीला धर्म-प्रांत इत्यादी कारणांमुळे होणारे संघर्ष ज्या कारणांमुळे वृिद्धगत होतात त्या मूळ कारणांवरसुद्धा उपाय आवश्यक आहे. केवळ बंदूक वापरून ‘चोख प्रत्युत्तर देणे’ हे अनेक वेळा शक्य नसते हे व्हिएतनाम, अफगाणिस्तान आणि आता इराकमध्ये सिद्ध होऊनसुद्धा लष्करी पॉवर्सना उमज आलेली नाही. काश्मीरप्रश्नी लष्करी ताकदीवर उपाय करू बघणाऱ्यांनी यावरून धडा घ्यावा.
– राजीव जोशी, नेरळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा