‘मुलांच्या भवितव्याविषयी चिंतित होऊन माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते,’ असे आमिर खान याने म्हटल्याचे वृत्त (लोकसत्ता, २४ नोव्हेंबर) वाचले. हा विचार ‘किरण राव’ यांच्या मनातील आहे, कोणा खान किंवा शेख इत्यादी कुलोत्पनाच्या मनातील नाही. धास्तीपायी माणूस कोठे जाऊ शकतो, ही शक्यता आणि धर्मापेक्षा संसार, कौटुंबिक जिव्हाळा याला महत्त्व दिले हेही लक्षात घेतले जावे. यापूर्वी येथे झुंडींचे राज्य नव्हते, ‘देश सोडून जा’ असे ‘सल्ले’ दिले जात नव्हते. आज सांविधानिक पदे संभाळणारेसुद्धा अशा भाषेत बोलतात. खुनी, दरोडेखोर, लाचखोर, बलात्कारी यांनी देश सोडण्याची मागणी एकाही नेत्याने केलेली नाही. अनतिकता किंवा कायदेभंग होत नाही अशा (धार्मिक) मतभेदांसाठी मात्र देशातून बाहेर काढण्याची मनीषा उफाळते.
– राजीव जोशी, नेरळ
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा