नोव्हेंबर महिन्यात पडणारा पाऊस तामिळनाडूवासीयांना अपेक्षित असला तरी, या वर्षी ऐन दिवाळीत पडलेला प्रचंड पाऊस मात्र अनपेक्षित आणि जीवघेणा ठरला. दीडशेहून अधिक नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या नसíगक आपत्तीमुळे घरगुती व सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या आपत्तीतून तामिळनाडूवासी हळूहळू सावरत असताना डिसेंबरच्या सुरुवातीस त्यांना पुन्हा एकदा पूर-परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.
भूकंप, पूर, त्सुनामी या नसíगक आपत्ती पूर्वसूचना न देता येतात, हे सत्य आहे. शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये ऐन थंडीत झालेल्या भूकंपानंतर तेथील लोकांना कोणत्या दिव्यातून जावे लागले हे आपण प्रसारमाध्यमांमुळे पाहू शकलो. आपल्या सरकारतर्फे तातडीने तेथे मदतही पोहोचवली. पण भारताचे दक्षिण राज्य तामिळनाडू येथे मात्र हवे तितके लक्ष दिले गेले नाही असे दिसले. ‘हवामानातील बदल’ या विषयावरील या समस्येवर पॅरिसमधील परिषदेत आपले पंतप्रधान गंभीरपणे विचार मांडताना दिसतात, पण तामिळनाडूतील पूरग्रस्तांची दखल पंतप्रधान केवळ टेलिफोनद्वारे घेतात, याची खंत वाटते.
– श्री विश्वकर, कोईमतूर – तमिळनाडू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा