‘शोकांतिकेचे सूत्रधार’ हा अग्रलेख (१६ फेब्रु.)वाचला. पुलवामा हा भारतीय जनमानसावर भयावह परिणाम करणारा हल्ला असल्यामुळे त्यावर होत असलेला जनआक्रोश, विरोध अपेक्षित. मात्र या शोकांतिकेचे सूत्रधार कोण, यामागील कोणत्याही कारणांचे विवेचन न करता त्याला उत्तर म्हणून काहीही करून बसणे केव्हाही अयोग्यच. कारण प्रत्येक समस्येचे उपाय हे त्याच्या कारणात दडलेले असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, निमलष्कराची लष्कराच्या तुलनेत असलेली कमकुवत बाजू आणि मुख्य म्हणजे अनेक तरुणांचे विशेषत: जम्मू-काश्मीरमधील तरुणांचे दहशतवाद्यांत रूपांतर होणे, वा अशा विविध कारणांचे विवेचन करणे अगत्याचे ठरते, ते अपरिहार्यच. तात्पर्य एखाद्या समस्येला मुळासकट उखडून फेकायचे असेल तर त्याच्या फांद्या कापून उपयोग नसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता आपण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा