दहशतवादामुळे भारत, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अशा अनेक देशांना दहशतवादी कारवायांचा त्रास भोगावा लागला. दहशतवादी अड्डय़ांचे केंद्रस्थान पाकिस्तान असून त्याची झळ पाकिस्तानला सोसावी लागल्याचे पंतप्रधान इम्रान खान कबूल करतात. ते म्हणतात, ‘‘दहशतवादामुळे पाकिस्तानचे १०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले. ७० हजार लोक मारले गेले.’’ हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे त्यांना धर्माध शक्तींमुळे अशक्य होते. भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांनी बालाकोट, चाकोटी, मुझफ्फराबाद ठिकाणचे दहशतवादी अड्डे नष्ट केल्यामुळे त्यांच्यावरील दहशतवादाचे संकट मोठय़ा प्रमाणात नष्ट झाले. म्हणून पाकिस्तानने भारतीय लष्कराचे आभार मानून अभिनंदन करावे. तसे न करता पाक सरकार मसूद अझर व अनेक दहशतवाद्यांना आयएसआयद्वारे संरक्षण पुरविते. पण हे दहशतवादी विंचू ते भारताविरुद्ध कारवायांसाठीची महाशक्ती म्हणून नेहमी वापरते, हे दुर्दैवी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा