‘भावनाकांडाचे भय’ हे संपादकीय (१८ फेब्रुवारी) सध्याच्या जहरी सूडवादी वातावरणातही विवेकबुद्धी शाबूत ठेवून वागू/बोलू इच्छिणाऱ्यांना दिलासा देणारे आहे. पुलवामाच्या निंदनीय घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे, पण या संतापाला जे सुडाचे स्वरूप आले आहे त्यामागे धार्मिक विद्वेषाचे जहर आहे. धार्मिक विद्वेषाची कबुली जाहीरपणे दिली जात नसली तरी ती वस्तुस्थिती आहे. कारण काश्मिरी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजवर ज्या संख्येने आपले जवान शहीद झाले आहेत त्याच्या कैक पट अधिक संख्येने नक्षलवाद्यांनी निमलष्करी वा अन्य जवानांना मारले आहे. (एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत.) पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. तेव्हा सध्याच्या सूडभावनेमागे शहीद जवानांविषयीचा दुखावेग किती आणि मनातील धार्मिक विद्वेषाची आग शांत करण्याचा सुप्त हेतू किती, हेही तपासावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा