‘आपत्ती आवडे सर्वाना!’ या अग्रलेखात (२० जून) सारा दोष सरकार व अधिकाऱ्यांचा असल्याचा सूर आहे, मात्र याला यात्रेकरूही तेवढेच जबाबदार आहेत. यंदा पावसाळा जोरदार असणार हे हवामान खात्याने मे महिन्यातच प्रसिद्ध केले होते. उत्तराखंड राज्यात पुराचे थमान प्रतिवर्षी आहे. हे यात्रेकरू कुणी झोपडीत राहणारे अशिक्षित, गोरगरीब नव्हते तर सुस्थापित, सुशिक्षित आहेत. हवामान खात्याने दिलेला इशारा त्यांनी का लक्षात घेतला नाही? यात्रेकरू कंपन्या तर या हानीला जबाबदार आहेतच. त्यांनी उत्तराखंड येथील हवामानाची कल्पना यात्रेकरूंना दिली होती काय? याची चौकशी व्हावी.
देवभोळेपणा बळी घेतो हे सार्वत्रिक सत्य आहे. लाखो भाविक एकाच वेळी जमणार असतील तर त्यांचे संरक्षण देवसुद्धा करू शकणार नाही! वसईचे काथोलिक जेरुसलेम, रोम (व्हॅटिकन) येथे जातात, याची आखणी धर्मसेवकच करतात. अशा यात्रेकरूंचे वय साठच्या वर असते. तेथले हवामान मानवत नाही. परत आल्यावर कित्येक आजारी पडतात, तर काही लवकर ‘मार्गस्थ’ होतात.
मार्कुस डाबरे, पापडी, वसई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा